विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वित्तीय संस्थांद्वारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे चिकित्सक अध्ययन
##semicolon##
https://doi.org/10.8224/journaloi.v74i2.792सार
आपल्या देशात पिकांचे यश आणि अपयश मुख्यतः हवामानाशी संबंधित घटकांवर अवलंबून असते. अनुकूल हवामान परिस्थितीमुळे पिके चांगली होतात तर प्रतिकूल परिस्थितीमुळे उत्पादन कमी होते. कृषी उत्पादनांच्या बाजारपेठा सामान्यतः असंघटित आणि अनियंत्रित असतात आणि बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन कमी किमतीत विकावे लागते. शिवाय, बहुतेक शेतकरी लहान शेतकरी असतात आणि ते घरगुती आणि लागवडीचा खर्च भागवण्यासाठी वेगवेगळ्या स्रोतांकडून पैसे उसने घेतात ज्याची परतफेड कठिण होउन जाते. ग्रामीण भागातील सर्व विकास आणि समृद्धी साध्य करण्याच्या उद्देशाने नाबार्ड विविध विकासात्मक उपक्रम, धोरणे आणि प्रकल्पांसाठी विविध गुंतवणूक आणि उत्पादन कर्ज प्रदान करते. नाबार्ड हे देखील सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करते की सर्व कृषी आणि ग्रामीण प्रकल्पांना योग्य आर्थिक मदत दिली जावी. म्हणूनच ग्रामीण भागात पैसा आणि संसाधनांशी संबंधित मुख्य मुद्दे उद्भवतात जेणेकरून आर्थिक आणि इतर मदत उपलब्ध होईल.